लग्न करून माहेरी आलेल्या प्रेयसीसोबत रात्री प्रियकरानं केलं ‘असं’ काही की जे कोणी पण करायला नको

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील उदयपुर जिल्ह्यातील धनकावाड़ा गावातील महुंड़ी मध्ये एक धक्कादायक प्रेम प्रकरणाचा अंत झाला आहे. यामध्ये प्रेमिकेला आपला जीव गमवावा लागला असून प्रेमी सध्या जेलमध्ये आहे.

पीपलाफला येथे राहणारी मीनाक्षी आणि गावातच राहणाऱ्या चतर सिंह यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. दोघांची जातही सारखी असल्यामुळे त्यांच्यात कोणत्याही कारणावरून वाद नव्हता. याचदरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी तिचे मार्च 2019 मध्ये अन्य दुसऱ्या शेजारील गावातील सुरेशशी लग्न लावून दिले. सुरेश मजदुरीचे काम करतो. मीनाक्षी नुकतीच दोन दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आलेली होती.

पुन्हा जुन्या प्रियकराची घेतली भेट आणि गमावले प्राण
शिवणकामसंबंधी एक काम असल्याचे सांगून मीनाक्षी घरातून निघाली आणि आपला जुना प्रियकर असलेल्या चतर सिंहला जाऊन भेटली. लग्नावरून आणि पळून जाण्यावरून दोघांमध्ये इतके कडाक्याचे भांडण झाले की चतरने मीनाक्षीचा गळा आवळला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेह सापडताच आरोपीला घेतले ताब्यात
मीनाक्षी रात्रभर घरी न आल्यामुळे घरच्यांनी तिला आसपासच्या परिसरात शोधण्याचा प्रयत्न केला. नंतर तिचा मृतदेह जंगलाच्या एका रस्त्यावर पडल्याचे समजले. तसेच तिच्या मृतदेहाची हालत काही ठीक नव्हती ठिकठिकाणी शरीरावर माती लागलेली होती तसेच तोंडातून आणि नाकातून रक्त आलेले होते. त्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. मुलीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चतराला ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरु केला.