मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असून मोठ्या प्रमाणात आमदार आणि नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यासाठी धडपड करत आहेत. याआधी देखील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून आता राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का बसणार आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यानंतर आता अनेक नेते रांग लावून तयार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये उदयनराजे भोसले यांच्यासह काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचाही समावेश आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त ताकद असलेल्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात असून अनेक मोठे नेते गेल्याने राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. येत्या काही दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
हे नेते देखील युतीच्या वाटेवर
याआधी अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला असून आणखी अनेक नेते शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल, त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील नेत्या रश्मी बागल, फलटणचे नेते रामराजे निंबाळकर त्याचबरोबर काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे देखील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
- केसांना रोज तेल लावणे असते लाभदायक, मिळते संपुर्ण पोषण, जाणून घ्या
- सावधान ! नेहमी स्वच्छ दिसणाऱ्या ‘या’ ५ वस्तू कधीच नसतात स्वच्छ, जाणून घ्या धोके
- वृध्दावस्थेत ‘या’ वेदना टाळायच्या असतील तर तारुण्यातच करा ‘पादोत्तानासन’
- ‘हे’ ५ पदार्थ चेहऱ्यावर लावण्याची करु नका चुक, त्वचा होऊ शकते खराब
- फळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या
- केळ ‘या’ खास पदार्थांसोबत खाल्ले तर होतील ‘हे’ खास लाभ, जाणून घ्या
- शाकाहारी व्यक्तींना मिळू शकतात नॉनव्हेजचे फायदे, ‘हे’ आवश्य सेवन करा
- आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने धुवा दूधाने केस, होतील ‘हे’ खास फायदे