उद्धव ठाकरे अपघाताने मुख्यमंत्री, त्यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी जन्माला आलेले नाही. ते नेता म्हणूनही जन्माला आलेले नाहीत. ते वारसा चालवत आहेत. उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. या सरकारच्या काळात झालेल्या कामाचे मूल्यमापन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला 100दिवस पूर्ण केले.

मात्र, या दिवसांतील कामाविषयी आणि राज्यासह देशातील राजकीय घडामोडींविषयी महाविकास आघाडी सरकारसह आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने जनतेची कामे केली नसल्याचे टीकास्त्र पाटील यांनी सोडले आहेत. दरम्यान, पाटील यांच्या टीकेनंतर शिवसेनकडून त्यांना उत्तर काय दिले जाणाार याबद्दल राजकीय जाणकरांचे लक्ष लागले आहे.