ठाकरे सरकारचा फडणवीसांना पुन्हा ‘धक्का’, केल्या ‘या’ नियुक्त्या रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांवर नव्या सरकारने स्थगित्या आणल्या आहेत. त्याच प्रमाणे आता नव्या सरकारद्वारे तत्कालीन फडणवीस सरकारने समित्या, मंडळ यावर केलेल्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.

त्यानुसार जिल्हा, तालुका दूध संघावरील 26 सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध समित्यांवरील अशासकीय नियुक्त्या देखील रद्द करण्यात येत आहेत.

नवे सरकार आले की जुन्या सरकार विविध समित्या, मंडळांवर केलेल्या अशासकीय नियुक्त्या रद्द करतात, त्याच प्रमाणे आता महाविकासआघाडीचे सरकार येत्या 15 दिवसात या नियुक्त्या रद्द करणार आहे. त्यानुसार आता देखील जिल्हा, तालुका दूध संघातील 26 सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. सल्लागार, दक्षता समित्यावरील अशासकीय नियुक्त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. फडणवीस सरकाराच्या काळात मंडळ, समित्यांवर या अशासकीय नियुक्त्या झाल्या होत्या.

या समित्या, मंडळात पक्ष किंवा सत्तेतील सरकारच्या जवळील व्यक्तींच्या नियुक्त्या होत असतात. तत्कालीन फडणवीस सरकारने केलेल्या या अशासकीय नियुक्त्या नव्या सरकार द्वारे आता रद्द केल्या जात आहेत.