मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आम्ही सत्ता स्थापनेसाठी राज्यापालांकडे 48 तास मागितले परंतु त्यांनी आम्हाला 6 महिने दिले असं वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
Uddhav Thackeray, Shiv Sena: BJP-Shiv Sena were together for many yrs but now Shiv Sena has to go with Congress-NCP. We'll hold further talks with both of them. I would like to thank Arvind Sawant, many people have lust for ministerial post but he isn't like that. Proud of him. pic.twitter.com/oxCKaPRUYR
— ANI (@ANI) November 12, 2019
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यपालांनी प्रथम भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. भाजपने 105 जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता. भाजपला 48 तास मिळूनही भाजप सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नाही. यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. परंतु आम्हाला 24 तासांचाच वेळ देण्यात आला. राज्यात सरकार स्थापन करणं ही गोष्ट वाटती तेवढी सोपी नाही. त्यामुळे आम्हाला जास्त कालावधीची आवश्यकता होती. कारण दोन भिन्न विचारधारा असणाऱ्या पक्षांशी आम्हाला चर्चा करायची होती. अनेक मुद्द्यांचं स्पष्टीकरण आम्हालाही हवं आहे त्यांना हवं आहे. त्यासाठी वेळ लागत आहे. आम्हालाही 48 तास हवे होते.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आम्ही सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे 48 तास मागितले होते. परंतु राज्यपाल खूप दयाळू आहेत, ते म्हणाले की तुम्हाला 48 तासांचा वेळ कमी पडेल. मी तुम्हाला 6 महिन्यांचा कालावधी देतो.” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला आहे.
युती का तुटली? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाला बगल दिली.
Visit : Policenama.com
- ‘फ्लॅट टमी’ दिवसभरात द्या फक्त १५ मिनिटे, ‘हे’ 6 व्यायाम करा
- गरोदर आहात ? सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय ? मग ‘हे’ 5 उपाय करा
- चुकीच्या जीवनशैलीमुळे लैंगिक समस्यांमध्ये वाढ ! नपुंसकतेमुळे अनेकजण त्रस्त
- वजन कमी करण्यासाठी काय करणार ? व्यायाम की आहारावर नियंत्रण, जाणून घ्या
- वजन कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय, जाणून घ्या
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या