मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामागील शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज्यपालांची सायंकाळी भेट घेणार आहे. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला निरोप राज्यपालांपर्यंत पोहचविणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.
शिवसेनेला ५० -५० टक्के सत्तेचा वाटा मिळावा, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज शिवसेनेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण सायंकाळी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगितले. या भेटीत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार आहे.
सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरे यांच्यांशी आपले बोलणे झाले असून त्यांचा निरोप राज्यपालांना पोहचविणार आहे, असे सांगितले. त्यामुळे शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. नागपूरच्या तरुण भारतमधून संजय राऊत यांच्यावर आजच्या संपादकीयमधूनजोरदार टिका करण्यात आली आहे. महायुतीचे सरकार बनण्यात संजय राऊत हे खोडाघालत असल्याचे टिका करुन त्यांना बेताल, विदुषक अशी विशेषणे बहाल केली आहे. यावर संजय राऊत यांनी आपल्याला तरुण भारत माहिती नाही, असे सांगत या टिकेकडे दुर्लक्ष केले.
Visit : Policenama.com
- भात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क ! बिनधास्त करा सेवन
- क्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली ? जाणून घेवूयात रहस्य
- वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या
- ‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय
- भातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
- मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट
- सावधान ! जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे
- गर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता
- ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ हवेत का ? मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा
- पौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस !