महाराष्ट्राचं ‘महाभारत’ ! शिवसेनेच्या आमदारांची पुन्हा ‘मातोश्री’वर बैठक, उध्दव ठाकरेंना भेटण्यासाठी नितीन गडकरी मुंबईकडे ‘रवाना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसून येत नसून शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. काल भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली मात्र सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यानंतर आज सत्तास्थापनेच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वेगवान पद्धतीने सुरु झाल्या असून आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या आमदारांची बैठक बोलावली असून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी हे मुंबईमध्ये आले आहेत. गडकरी हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले आहेत. भाजप राष्ट्रपती राजवट लावणार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार याचा पुनरुच्चार देखील केला आहे.

बैठकीनंतर निर्णय शक्य –

उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत जावे कि नाही याविषयी आमदारांची मते जाणून घेतली जाणार आहेत. तसेच या बैठकीनंतर ते अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील काल आमदारांशी चर्चा करत त्यांची भेट घेतली. जवळपास 90 मिनिटे आदित्य ठाकरे यांनी आमदारांशी चर्चा केली.

उद्धव यांना राजी करण्याचे काम –

सरकार स्थापन करण्यासाठी अतिशय कमी कालावधी शिल्लक राहीला असून भाजपच्या गोटात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मुंबईकडे रवाना झाले असून आज उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना गळ घालणार आहेत. त्यानंतर गडकरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

आम्ही झुकणार नाही –

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास हा राज्यातील जनतेचा अपमान असणार आहे. तसेच हा राज्यावर अन्याय असणार आहे. त्यामुळे आम्हाला पुढे काय करायचे आहे हे माहित आहे. तसेच सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि, कोणताही निर्णय घेताना सर्व आमदार एका ठिकाणी असावेत, म्हणून आम्ही सर्व आमदारांना एकत्रित ठेवले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात आमदार फोडणे शक्य होणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही कधीही कुणापुढे झुकलो नसून शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आम्ही स्वाभिमानाने जगलो आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके