मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०२७ पर्यंत भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या अहवालात देण्यात आली आहे. भारताच्या लोकसंख्येत २०५० पर्यंत २७. ३ कोटींची वाढ होऊ शकते. याबरोबरच भारत लोकसंख्येच्या बाबतीत शेजारी देश चीनला मागे टाकणार आहे.
संयुक्त राष्ट्राचा अहवाल
‘द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट २०१९ हायलाईट्स’मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या पॉप्युलेशन डिव्हिजनने अहवाल दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, आगामी ३० वर्षांमध्ये जगाच्या लोकसंख्येत दोन अब्जांपर्यंत वाढ होईल. २०५० पर्यंत लोकसंख्येत दोन अब्जांनी वाढ होऊन, ती ७. ७ अब्जांवरुन ९. ७ अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जगाची लोकसंख्या या शतकाच्या अखेरपर्यंत सुमारे ११ अब्जांपर्यंत पोहोचू शकते.
भारत चीनला मागे टाकणार
सध्या लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसऱ्या क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या १. २१ अब्ज आहे, तर चीनची लोकसंख्या १. ३८ अब्ज आहे.
२०५० पर्यंत लोकसंख्येत जी वाढ होईल, त्यापैकी निम्मी वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इथियोपिया, टांझानिया , इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिकेत होईल.
अभिनेता स्वप्नील जोशीचा ‘मोगरा फुलला’ तर अभिनेत्री तापसीचा पन्नूचा ‘गेम ओव्हर’
विराट कोहलीच्या ‘गळ्यात’ पडली अभिनेत्री उर्वशी रौतेला ; पुढे झाले ‘असे’ काही, जाणून घ्या
आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)
‘लैंगिक’ क्षमता जागृत करण्यासाठी योगासनांची ‘विशेष’ भूमिका
नियमीत योगा केल्याने ‘हे’ फायदे, जाणून घ्या
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच