Budget 2020 : भाषण लांब पण बजेटमध्ये काहीच नसल्याचं राहुल गांधींचं म्हणणं, अर्थसंकल्प दिवाळीखोरीचा असल्याचं अखिलेश यांनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचे बजेट 2.0 (2020-21) सादर केले. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी बऱ्याच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी आयकर स्लॅब बदलला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाला विरोधकांचा प्रतिसादही येऊ लागला आहे. काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. राहुल म्हणाले, “अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खूप लांब भाषण केले, परंतु त्यांच्या भाषणात काहीही नव्हते.” त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिवाळखोर अर्थसंकल्प म्हणून याचे वर्णन केले आहे.
काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल आणि आनंद शर्मा यांनीही मोदी सरकारच्या 2020-21 च्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्वीट केले की, ‘ दुश्मन न करे दोस्त ने जो काम किया है, साल भर का गम, गरीबों पर जुल्मो सितम, फिर से जनता को इनाम दिया है.’ तर दुसरीकडे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले, ‘निर्मला सीतारमण अर्थसंकल्पाचे गणित स्पष्ट करण्यात अपयशी ठरल्या आहेत. जीडीपी 4.8% च्या वाढीसह, 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य एक ‘पाईप ड्रीम’ आहे.
दुश्मन न करे दोस्त ने जो काम किया है
साल भर का गम
गरीबों पर जुल्मो सितम
फिर से
जनता को ईनाम दिया है | #Budget2020 #BudgetSession2020 #NirmalaSitharaman— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) February 1, 2020
Goal of 5 Trillion dollar Economy by 2024 with a GDP growth of 4.8% is a pipe dream . To achieve that requires uninterrupted double-digit GDP growth. #Budget2020
— Anand Sharma (@AnandSharmaINC) February 1, 2020
काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले की, ‘वित्तीय तूट 8.8 टक्के आहे हे अर्थमंत्र्यांनी मान्य केले याचा मला आनंद आहे. त्यांनी देशाला हे सांगायला हवे होते की जर आपण संघ आणि राज्याचा तोटा केला तर ते 8% पेक्षा जास्त आहे, ही देशासाठी चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर काॅंग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, ‘चांगली गोष्ट म्हणजे आयकरात सूट असू शकते. 12.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या मध्यमवर्गीय कुटुंबांना यातून दिलासा मिळणार आहे. त्याशिवाय अर्थसंकल्पात काही विशेष जाणवले नाही.
बजट 2020-21 पर कांग्रेस नेता, कपिल सिब्बल: मुझे खुशी है कि वित्त मंत्री ने स्वीकार किया कि राजकोषीय घाटा 3.8% है। उनको देश को यह भी बताना चाहिए था कि अगर आप यूनियन और स्टेट का घाटा जोड़े तो यह 8 % से ज्यादा है जो देश के लिए चिंता की स्थिति है। pic.twitter.com/VMZQ8De8c8
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2020
#Budget2020 कांग्रेस नेता शशि थरूर: एक अच्छी चीज शायद आयकर में दी गई छूट हो सकती है। 12.5 लाख के नीचे की आय वाले मध्यम वर्गीय परिवारों को इससे राहत मिलेगी। उसके अलावा बजट में कुछ खास नहीं लगा। pic.twitter.com/lvzLJPcwS8
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2020
अर्थमंत्र्यांचे आत्तापर्यंतचे सर्वांत लांब बजेट भाषण :
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट भाषण केले. यापूर्वी 2003 मध्ये जसवंत सिंग यांनी 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले होते. सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण यांचे भाषण सुरू झाले जे अडीच तासापेक्षा जास्त चालले. मात्र, सतत अडीच तास बोलूनही अर्थमंत्री आपले भाषण पूर्ण करू शकल्या नाहीत. त्याच्या गळ्यात थोडी समस्या असल्याणे त्यांनी आपले उर्वरित भाषण सभागृहाच्या पटलावर ठेवले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इतर मंत्र्यांनी आवाहन करीत त्यांना आपले बजेट पटलावर ठेवण्यास सांगितले.