सरकारच्या ‘कमतरता’ सांगितल्यास आम्ही त्यामध्ये ‘सुधारणा’ करू, अर्थतज्ञांच्या बैठकीत PM मोदींचं ‘आवाहन’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा दुसरा अर्थसंकल्प 2020 सादर होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मॅरेथॉन बैठक घेतली. यानंतर अर्थशास्त्रज्ञ चरण सिंह म्हणाले की ग्रामीण भागात खर्च वाढवण्याची गरज आहे, ना की आयकरता सूट देणे. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी बैठकीत म्हणाले की जर सरकारच्या धोरणात काही कमतरता असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्या सुधारण्यास तयार आहोत. याचे सर्व अर्थशास्त्रज्ञांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी आर्थिक वृद्धीला गती देण्यासाठी उपाय आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर चर्चेसाठी नीति आयोगामध्ये अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांची बैठक घेतली. ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा आर्थिक वृद्धी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
बैठकीत काय झाले –
बैठकीनंतर उद्योगपती अरविंद मेलिगिरी यांनी सांगितले की विविध क्षेत्रातील लोक वेगवेगळे उपाय सुचवत आहेत. पंतप्रधानांनी आम्ही सांगितलेले उपाय सकारात्मकतेने ऐकून घेतले आहेत. मी प्रकल्पांना देण्यात येणारी मंजुरीला सोपे करण्याचा सल्ला दिला.
याआधी, पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशातील उद्योजकांबरोबर अर्थव्यवस्थेवर चर्चा केली. बैठकीत रतन टाटा, मुकेश अंबानी आणि गौतम अडानींसह 11 उद्योजक उपस्थित होते. या दरम्यान आर्थिक विकास दर आणि रोजगारांच्या संधी वाढण्याच्या उपायांवर चर्चा झाली.
या बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि इतर मंत्र्यांशिवाय नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देवराय या बैठकीत उपस्थित होते. सरकार 2020-21 च्या अर्थसंकल्पाच्या प्रस्तावाच्या तयारीला लागले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक फेब्रुवारीला आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करतील. यात देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान सरकारसमोर असेल. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जीडीपी पाच टक्के राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, 2018-19 मध्ये हा दर 6.8 टक्के होता, सरकारने मंगळवारी ही माहिती दिली. उद्योग आणि कोअर सेक्टरमध्ये मंदीची परिस्थिती आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये वृद्धी दर कमी होऊन 4.5 टक्के झाला होता.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ 5 टिप्स फॉलो केल्यास दिवसाची सुरुवात होईल चांगली
- दाढी करण्यासाठी ‘रेझर’ वापरताय? ‘या’ 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका !
- मुलांना कोणतं खेळणं देताय ? होऊ शकतात ‘हे’ 6 गंभीर धोके !
- ‘अॅस्प्रिन’ने टळू शकत नाही ‘हार्ट अटॅक’चा धोका ! हे आहेत 4 धोके
- ‘टीबी’ ची ही 6 कारणे जाणून घेतली तर टाळता येणे सहज शक्य, जाणून घ्या
- काळे मीठ खा; हृदयरोगांना दूर ठेवा, ‘हे’ आहेत 9 फायदे
- मुलांना होणारा क्षय ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या
- मुलांना ‘पॅरासिटामोल’ देताय ? तारुण्यात होईल अस्थमा ! ‘हे’ आहेत 6 धोके
- दम्याची ही आहेत 8 लक्षणे, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर वाचा