90 % जळल्यानंतर देखील 1 KM पळाली बलात्कार पिडीता, स्वतः केला 100 नंबरवर ‘कॉल’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव येथील बलात्कार पिडीत मुलीला जाळण्याची घटना घडली होती. पोलिसांनी याबाबतच्या तपासाला सुरुवात केली आणि पोलीस घटनास्थळी पोहचले असता स्थानिकांनी माहिती दिली की, पिडीता 90 % भाजलेली असूनही एक किलोमीटरपर्यंत पायी चालत गेली होती. त्यानंतर घराबाहेरील एका व्यक्तीने तिला मदत केली. त्यानंतर पिडीतेने स्वतः ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना सर्व माहिती दिली. त्यानंतर पीआरवी आणि एक रुग्णवाहिका पिडीतेपाशी पोहचली होती.
नातेवाईक पोहचले रुग्णालयात –
पिडीतेला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. परिस्थिती खूप गंभीर झाल्याने तातडीने पिडीतेला लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पिडीतेच्या अनेक नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. लखनऊच्या रुग्णालयात पिडीतेला प्लास्टिक सर्जरी बर्न यूनिटमध्ये ठेवण्यात आले आहे आणि पुढील उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या मते पिडीता 90 % जळालेली आहे.
या घटनेनंतर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विटरद्वारे राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. युपी सरकार म्हणते की येथे सर्व काही ठीक आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत खोटे वक्तव्य आणि खोटा प्रचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि युपी सरकारची आहे. अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.
कल देश के गृह मंत्री और उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री ने साफ-साफ झूठ बोला कि यूपी की क़ानून व्यवस्था अच्छी हो चुकी।
हर रोज ऐसी घटनाओं को देखकर मन में रोष होता है। भाजपा नेताओं को भी अब फर्जी प्रचार से बाहर निकलना चाहिए।https://t.co/XGqvqu7Dxd
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 5, 2019
उन्नाव पीड़िता के स्वास्थ्य समाचार से मन आहत है। ईश्वर से प्रार्थना है कि पीड़िता जल्द स्वस्थ हो।
कल भाजपा सरकार का बयान था यूपी में सब ठीक है। आज एक बयान और आया। लेकिन क़ानून व्यवस्था के बारे में झूठी बयानबाज़ी व झूठा प्रचार करने की ज़िम्मेदारी CM और उप्र सरकार की ही है।#Unnao
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 5, 2019
युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील याबाबतची माहिती आपल्या अधिकाऱ्यांकडून मागवली आहे. पिडीतेला सरकारी खर्चासाठी संभाव्य मदत दिली जावी असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या तापासाठी सक्रिय करण्यात आले आहे.
राज्य सरकारने सर्व आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. यातील पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र पिडीतेची परिस्थीती अजून देखील गंभीर आहे.
- नियमित खजूर खाल्ल्याने होतात ‘हे’ ११ आरोग्य फायदे, जाणून घ्या
- तुळस औषधी असली तरी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होतील ‘हे’ ५ साईड इफेक्ट
- नियमित खा शेंगदाणे, होतील ‘हे’ आरोग्यदायी १० फायदे, जाणून घ्या
- तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या
- सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय
- ‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे
- संत्र्यापेक्षा सरस आहे शिमला मिरची ! ‘हे’ आहेत ७ आश्यर्चकारक फायदे