कन्नौज : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे जीटी रोड महामार्गावर एका डबल डेकर बसला ट्रकने दिलेल्या धडकेत बसला आग लागून त्यात २० जणांचा मृत्यु झाला. बसमधील २१ जण जखमी झाले आहेत. या अपघातात ट्रकलाही आग लागली होती.
Around 20 people feared killed in a massive fire that broke out following a collision between a bus and a truck near Chiloi village in UP's Kannauj.
— Press Trust of India (@PTI_News) January 10, 2020
कन्नौजमधील गुरसहायगंजमधून ही बस जयपूरला जात होती. ही बस फरुर्खाबादची असून त्या गुरुसहायगंजचे २६ आणि छिबरामऊचे १७ प्रवासी बसले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता बसमधील सर्व प्रवासी झोपेत असताना ट्रकने या बसला जोरदार धडक दिली. थंडी असल्याने बसच्या सर्व खिडक्या आणि दारे बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बसच्या आतमध्येच त्यांचा आगीत होरपळून मृत्यु झाला. याबाबत पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितले की, बसमधील २५ प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. त्यातील १२ जण तिरवा मेडिकल कॉलेज आणि ११ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दोघांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश के कन्नौज में हुए भीषण सड़क हादसे के बारे में जानकर अत्यंत दुख पहुंचा है। इस दुर्घटना में कई लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है। मैं मृतकों के परिजनों के प्रति अपनी संवेदनाएं प्रकट करता हूं, साथ ही घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2020
या बसमधील १८ ते २० प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा मृत्यु झाला असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बस पूर्णपणे भरलेली होती. बसला आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला. सर्व जण एकाच वेळी बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. १० ते १२ लोक उतरण्यात यशस्वी झाले.
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी ने जनपद कन्नौज में डबल डेकर बस में आग लगने की घटना का त्वरित संज्ञान लिया है।
मुख्यमंत्री जी ने जनपद कन्नौज के जिलाधिकारी व पुलिस अधीक्षक को तत्काल घटनास्थल पर पहुंचने और यात्रियों को बेहतर चिकित्सा सुविधा मुहैया कराने के निर्देश दिए हैं।
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) January 10, 2020
Kannauj: A bus carrying 50 passengers catches fire after collision with a truck on GT Road. Fire tenders have rushed to the spot. More details awaited pic.twitter.com/aRdZC8ElhG
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 10, 2020
IG (Kanpur range) Mohit Agarwal: The bodies are badly burned, their bones are scattered,so only a DNA test will determine the death toll. Prima facie bodies of 8-10 people seem to be on the bus but the damage is so extensive that casualties can be determined only through DNA test https://t.co/v7RR2Etnka
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 11, 2020
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनाग्रस्त लोकांना सर्व प्रकारची मदत देण्याचे आदेश दिले आहेत. मृत्युच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- निराश व्यक्तीकडे वेळीच द्या लक्ष, ‘ही’ आहेत 4 लक्षणे, होऊ शकतो मृत्यू
- जास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम, दोन हात लांबच राहा !
- मोबाईलचे ‘हे’ 7 दुष्परिणाम माहित आहेत का ? जाणून घ्या किती घातक !
- वृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त ‘ही’ समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
- ‘एनर्जी ड्रिंक्स’ चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका
- ‘मंकीपॉक्स’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, वेळीच व्हा सावध !
- अळूची पाने आरोग्यासाठी वरदान! ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या