मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेने साद दिली तर भाजपाची दारं आजही खुली आहे असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते असे राऊत म्हणाले आहेत.
भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, ‘आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका. दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते. आता वेळ निघून गेली आहे. आम्ही पुढे आलो आहोत. विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करा. विरोधी पक्षाचा इतिहास पाहता काम चांगले करा. आमचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न भाजपाने केला. बाळासाहेबांचे विचार, अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांचे विचार आम्हाला माहित आहे. बाळासाहेबांचे फोटो लावूनच भाजपा वाढली. आम्ही स्वतंत्र्यपणे लढलो असतो तर100 च्या वर जागा जिंकल्या असत्या. जी भूमिका मिळाली आहे ती निभवा. फडणवीसांच्या कोणत्याही वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नाही. ‘
निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामुळे बहुमत असूनही अद्याप युतीची सत्ता स्थापन न होता काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेनेने मिळून सरकार बनवले. त्यामुळे भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की ओढवली.
फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/
- ‘वजन घटवताना अवेळी भूक लागते का? ‘या’ ४ पद्धतीने करा नियंत्रण
- वजनाचा तोल सांभाळण्यासाठी शिका कॅलरीचे गणित, ‘या’ १४ गोष्टी लक्षात ठेवा
- रक्तदाबाची सामान्य पातळी किती? सुमारे ५० टक्के लोक अनभिज्ञ
- हायपरटेन्शन आजाराची ‘ही’ आहेत ७ लक्षणे, आणि ४ गंभीर परिणाम
- तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या ४ योग्य-अयोग्य पद्धती