Vastu Tips : वास्तुदोष दूर करण्यासाठी ‘मीठ’ प्रभावी, राहु-केतुचा अशुभ प्रभाव सुद्धा करते दूर
पोलीसनामा ऑनलाइन टीम – मीठ जेवणात जेवढे आवश्यक आहे, तेवढेच व्यक्तीच्या जीवनात सुद्धा मीठाला महत्वपूर्ण मानले जाते. मीठ केवळ जेवण चविष्ठ बनवत नाही तर यामध्ये नकारातमक उर्जा दूर करण्याची अद्भूत शक्ती सुद्धा आहे. वास्तुशास्त्रानुसार, मीठ व्यक्तीचा तणाव आणि थकवा दूर करण्यासह राहु-केतुचा अशुभ प्रभावसुद्धा दूर करू शकते.
* घरात पैशाचा प्रवाह कायम राखण्यासाठी काचेचा एक ग्लास घेऊन त्यामध्ये पाणी आणि मीठ मिळसून घराच्या नैऋत्य कोपर्यात ठेवून द्या. सोबतच त्याच्या पाठीमागे एक लाल रंगाचा बल्ब लावा. जेव्हा पाणी सुकेल तेव्हा तो ग्लास स्वच्छ करून पुन्हा मिठ आणि पाणी मिसळून भरून ठेवा. असे केल्याने आर्थिक समृद्धी कायम राहते.
* वास्तुशास्त्रानुसार, मीठाचा वापर केल्याने घरात सकारात्मक उर्जेचा संचार राहतो, तसेच सुख-समृद्धी वाढते.
* रात्री झोपताना पाण्यात एक चिमुट मीठ मिसळून हात-पाय धुतल्याने तणाव दूर होतो आणि झोप चांगली येते. सोबतच राहु-केतुचा अशुभ प्रभाव सुद्धा दूर होता.
* वास्तुनुसार, मीठ जमीनीवर पडणे अशुभ आहे. घरात मीठ पडल्याने चंद्र आणि शुक्र दोन्ही कमजोर होतात.
* स्टील आणि लोखंडाच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नये. मीठ नेहमी काचेच्या जारमध्ये भरून ठेवा.
* जर तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये राहात असाल तर आंघोळ करताना एक चिमुटभर मीठ आंघोळीच्या पाण्यात मिसळा. यानंतर स्नान केल्याने तणावातून मुक्ती मिळते.
* जर घरात भांडण किंवा वाद होत असतील तर वॉशरूममध्ये एका काचेच्या भांड्यात लाहोरी मीठ भरून ठेवा आणि प्रत्येक शुक्रवारी ते बदला.
* आठवड्यात एकदा गुरुवार सोडून लादी स्वच्छ करताना पाण्यात थोडे खडे मीठ (समुद्र मीठ) मिसळा. यामुळे नकारात्मकता दूर होते.