पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वीर धरणातून बुधवारी (दि. ३१) सायंकाळी पाच वाजता धरणाच्या पाच दरवाजातून २२ हजार ९८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे व शाखा अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिली.
नीरा खोऱ्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेञात मंगळवारी सायंकाळ पासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी रात्री ११ वाजता
९००० क्युसेक्स पाणी कमी करण्यात आले होते. तसेच बुधवारी (दि.३१) पहाटे पाच वाजता आणखी
९००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कमी करून तीन दरवाजातून १३ हजार ५३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला होता.
दरम्यान, बुधवारी दुपारपासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे बुधवारी संध्याकाळी पाच दरवाजातून २२ हजार ९८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. त्यामुळे पुन्हा नीरा नदी दुधडी वाहू लागली आहे. तसेच नीरा देवघर व भाटघर धरण सुमारे ८०टक्क्यांपर्यंत झाले असून ते ही भरण्याच्या मार्गावर आहे.
- दिव्यांच्या अमावास्येला ‘अशी’ करा दिव्यांची स्वच्छता
- ‘या’ गंभीर आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी वेळेत करा ‘या’ १० तपासण्या
- कॅन्सरसह ‘या’ गंभीर आजारांवर ‘काळे जिरे’ गुणकारी, जाणून घ्या
- बॅड कोलेस्टेरॉलसाठी कर्दनकाळ आहेत ‘या’ ७ भाज्या, जाणून घ्या
- दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या
- ‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !
- लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा
- ‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या
- ‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा
- ‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या