विधानसभा 2019 : राज्यात 6 वाजेपर्यंत 60.5 टक्के मतदान पार पडलं !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नुकतंच मतदान पार पडलं. राज्यातील 3 हजार 237 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. रविवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने निवडणूक यंत्रणांना थोडे कष्ट घ्यावे लागले. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान पार पडलं. राज्यात 60.5 टक्के मतदान पार पडलं.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच सोबतच साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. राज्यात 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत.
पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याने ही निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली.
96 हजार मतदान केंद्रे
राज्यात 96 हजार 661 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. यामध्ये 95 हजार 673 ही मुख्य तर 1188 ही सहाय्यक केंद्रे होती. एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 4 कोटी 68 लाख 75 हजार 750 पुरुषांचा समावेश होता. यावेळी 2634 तृतीयपंथी, 3 लाख 96 हजार अपंग आणि 1 लाख 17 हजार 581 सर्व्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
Visit :Policenama.com
- अंडी आणि दालचिनी मधुमेहावर आहे गुणकारी औषध, जाणून घ्या –
- ‘इन्सुलिन’चे इंजेक्शन योग्यपद्धतीने घ्या, अन्यथा मधुमेह राहणार नाही नियंत्रणात –
- अर्ध्यावर जीम सोडणे, आरोग्यासाठी आहे गंभीर, जाणून घ्या धोके –
- ‘डाएट’च्या नावाखाली करू नका चूका, अन्यथा आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –
- सकाळी लवकर जाग येण्यासाठी करा ‘या’ गोष्टी, पहाटे येईल जाग –
- ‘या’ फुलांमुळे तुमची त्वचा राहू शकते निरोगी, जाणून घ्या –
- तरुणांमध्ये का बळावतोय ‘उच्च रक्तदाब’! जाणून घ्या कारणे –
- व्यायाम व झोपेसाठी जपानी कर्मचाऱ्यांना मिळतो ऑफिस कामातून ब्रेक, जाणून घ्या –
- सुंदर दिसण्यासाठी एक तास करा योगासने आणि प्राणायाम, जाणून घ्या –