‘मुन्नाभाई MBBS’ च्या तिसऱ्या पार्टसाठी चाहत्यांना का पहावी लागेल वाट ? विधु विनोद चोपडांना कुणाची प्रतिक्षा ?

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अरशद वारसी (Arshad Warsi) स्टारर मुन्नभाई एमबीबीएस हा सिनेमा खूप गाजला. यातील अनेक डायलॉग आजही फेमस आहेत. प्रोड्युसर डायरेक्टर विधु विनोद चोपडा आणि डायरेक्टर राजकुमार हिरानी या सिनेमाच्या बंपर यशानंतर याचा दुसरा पार्टही बनवला होता. लगे रहो मुन्नाभाई असं याचं नाव होतं. यालाही चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं. आता मात्र चाहत्यांना याच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे. संजय दत्त आणि अरशद वासरीच्या शानदार जोडीला चाहते पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहू इच्छित आहेत.

विधु विनोद चोपडा यांनी एका मुलाखतीत मीडियाला सागंतिलं होतं की, एका चांगल्या स्क्रिप्टची प्रतिक्षा आहे. मुन्नाभाईचा तिसरा पार्ट आम्ही बनवू शकतो. परंतु जोपर्यंत एखादी शानदार स्क्रिप्ट मिळत नाही तोपर्यंत आम्ही वाट पाहू. अद्याप आमच्या समोर अशी एकही स्क्रिप्ट नाही की, जी पाहून असं वाटेल की, आम्ही यावर सिनेमा बनवू शकतो.

विधु विनोद चोपडांनी हा खुलासा केल्यानंतर आता चाहत्यांमधील उत्सुकता आणखीच वाढल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना यासाठी वाट पहावी लागणार आहे असं वााटत आहे. संजय दत्त, अरशद वारसी, बोमन इराणी, ग्रेसी सिंह, जिमी शेरगिल, सुनील दत्त स्टारर मु्न्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा 2003 साली आला होता. हा सिनेमा त्या वर्षातील हिट सिनेमापैकी एक होता.