पवारांनी अनेक मंत्रिपदं भूषविली मात्र स्वजातीसाठी काहीच केले नाही : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीच्या आधारे राजकारण केले. स्वत: मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली, पण ‘त्या’ जातीसाठी त्यांनी काहीच केले नाही. त्या जातीसाठी जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले. असे वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.

प्रसार माध्यमांशी बोलतांना विनोद तावडे यांनी सांगितले आहे. शरद पवार यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटले आहे की, फडणवीसांची जात मी गेल्या पाच वर्षात कधी काढली ? पण शरद पवार बहुधा विसरले की, ज्यावेळी छत्रपती संभाजी राजे यांना नरेंद्र मोदी यांनी जेव्हा राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले, त्यावेळी शरद पवार यांचे वक्तव्य होते की, जुन्या काळात छत्रपती फडणवीस नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना नेमायला लागले आहेत.

त्यामुळे इतका विखारी जातीयवाद हा शाहु, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळेच पाहायला मिळाला आहे. असे विनोद तावडे यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, तरुणांना हे अजिबात आवडत नाही, विकासावरच राजकारण केले पाहिजे आणि प्रगतीवरच राजकारण केले पाहिजे, असा हा पुरोगामी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, सुप्रिया सुळे व राहुल शेवाळे यांच्यामधील एक ऑडिओ क्लीप व्हाययरल झाली. याबाबत त्यांना विचारले असता, सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करायला नको होते. त्या अशा प्रकारचे वक्तव्य कधी करताना आपण ऐकलेले नाही, परंतु कधी कधी ज्यावेळी समोर पराभव दिसायला लागतो, तेव्हा भान राहत नाही आणि माणूस असा सैरावैरा वागायला लागतो. असा टोलाही त्यांनी लगावला.

इतकेच नव्हे तर, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीच्या आधारे राजकारण केले. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद स्वत: भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली, पण ‘त्या’ जातीसाठी पवार यांनी काहीच केले नाही. जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले हे पवार यांनी लक्षात ठेवावे. असेही त्यांनी म्हंटले.