पत्नीला सोबत राहु द्या ना! विराटचं BCCI ला मागणं….

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

नुकत्याच विवाह बंधनात अडकलेला भारताचा कर्णधार विराट कोहली व सिनेअभिनेत्री अनुष्का शर्माचे प्रेम जगजाहीर आहे. आता हे दोघे एकमेकांन पासून क्षणभर ही दुर राहु शकत नाही. याचा प्रत्यय एव्हाना आपल्याला आलाच असेल.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’158c4515-cad1-11e8-afeb-a1a2627bc08c’]

पण आता हद्दच झालीये..भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) विनंती केली आहे. त्या विनंतीत त्याने परदेश दौऱ्यावर खेळाडू व साहाय्यक कर्मचाऱ्यांना आपापल्या पत्नीसोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. पण, BCCIच्या नियमानुसार परदेश दौऱ्यातील खेळाडू व साहाय्यक कर्मचारी यांनी त्यांच्या पत्नीसोबत केवळ दोन आठवडे राहता येत होते. मात्र, कोहलीने संपूर्ण दौऱ्यात त्यांना सोबत राहण्याची विनंती केली आहे.

पुणे : वाढदिवसानिमित्त उचलला विद्यार्थ्यांचा वार्षिक खर्च

कोहलीने प्रथम बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही विनंती व्यक्त केली. त्याने ही विनंती प्रशासकीय समितीसमोर मांडली जाईल याचीही दक्षता घेतली. कोहलीने तशी विनंती केल्याच्या वृत्ताला प्रशासकीय समितीच्या सुत्रांनी दुजोरा दिला. मात्र, या नियमात तुर्तास तरी बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

[amazon_link asins=’B07D1Z5625,B00INTOOMK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’513fc73f-cad1-11e8-b7b1-4ddd472de280′]