दमदार पावसासाठी अजून सात ते आठ दिवस प्रतीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

यंदा देशामध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यात महाराष्ट्रामध्ये पावसाने काही दमदार आगमन केले नसल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडला आहे. तर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सध्या कमी दाबाची क्षेत्रे कार्यरत नाही. त्यामुळे दमदार पावसासाठी राज्यातील नागरिकांना आणखी सात ते आठ दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील बहुतांश भागात यंदा सुरुवातीला पावासाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहे.आता शनिवारपासून कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.त्यामुळे कधी जोरदार पाऊस होतो.याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.