आम्हाला ‘काळजीवाहू’ सरकारचीच काळजी, संजय राऊतांचा फडणवीसांना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता समीकरण जुळत नसल्याने आणि शिवसेनेचा पाठींबा न मिळाल्यामुळे राजीनामा दिला आहे. मात्र यावेळी फडणवीस यांनी अनेक गोष्टींचा खुलासा करत शिवसेनेवर अनेक आरोप केले. यातील काही आरोपांबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्ता स्थापनेचा दावा न केल्यामुळे त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. मात्र आम्हाला त्यांचीच काळजी आहे. असे देखील संजय राऊत म्हणाले. तसेच देवेंद्र फंडणवीस यांनी शिवसेनेला अडीच वर्षांबाबत कोणताही शब्द न दिल्याचे सांगितले होते. मात्र फडवीसांच्या या वक्तव्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच उत्तर देतील असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.

आम्ही शिवसेनेबाबत कोणतेही अपमानास्पद वक्तव्य केले नाही. मात्र शिवसेना भाजप आणि नरेंद्र मोदींवर वारंवार टीका करत होती. असे देखील फडणवीस म्हणाले. मात्र संजय राऊत यांनी फडणवीसांचे हे वक्तव्य पूर्णपणे फेटाळून लावले आहे. आम्ही गेल्या पंधरा दिवसात भाजप किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही टीका केली नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच !

सत्ता स्थापनेबाबत पत्रकारांनी विचारले असता पुन्हा एकदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होऊ शकतो आणि आम्ही यावर ठाम असल्याचेही राऊत यांनी ठणकावून सांगितले. मात्र यासाठीच्या संख्याबळावर बोलणे राऊत यांनी टाळले.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके