नवी दिल्ली : वृत्त संस्था – जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही ही निवडणूक लढविली. मोदींनी मात्र ही लढाई द्वेषाने लढली तर आम्ही प्रेमाने लढा दिला. आता प्रेमाचाच विजय होईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील औरंगजेब लेन येथील शाळेत मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदींवर हल्ला करण्याची संधी सोडली नाही.राहुल गांधी म्हणाले की, ही निवडणुक आम्ही जनतेशी निगडीत असलेल्या बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटा बंदी, जीएसटी तसेच भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर लढविली.
या निवडणुकीत चांगली लढाई झाली़. मोदींनी ही लढाई द्वेषाने लढली तर आम्ही प्रेमाने लढा दिला. आता प्रेमाचाच विजय होईल, असा मला विश्वास आहे, असे राहुल गांधीने सांगितले़