कलकत्ता (पश्चिम बंगाल) : वृत्तसंस्था – अभिनेता अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये मोदींनी ममता बॅनर्जी या आपल्याला कुर्ता आणि मिठाई पाठवतात असे सांगितले होते. या वक्तव्यावरून ममतादीदी चांगल्याच भडकल्या असून त्यांनी आता मोदींना मातीचा लाडू पाठवणार असल्याचे सांगितले. पश्चिम बंगाल येथील एका सभेत बोलताना म्हणाल्या.
मोदींच्या त्या वक्तव्याचा समाचार घेताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मोदींना आता दगड आणि माती पासून तयार केलेली मिठाई पाठवणार आहे. ती मिठाई खाल्ल्यानंतर त्यांचे दात तुटतील असे सांगत त्यांनी आपला मोदींवरचा संताप व्यक्त केला. मोदी हे कधीच पश्चिम बंगालमध्ये आले नाहीत. त्यामुळे त्याना बंगालमधील रसगुल्ला देणार आहे. तर त्यांच्यासाठी खास मातीपासून मिठाई तयार करणार आणि त्यामध्ये दगडांचा वापर करू. ज्याप्रमाणे लाडू तयार करताना आपण त्यामध्ये बदाम, काजू, बेदाणे घालतो तसे या मिठाईमध्ये दगडांचा वापर करू. ही मिठाई खाल्ल्याने त्यांचे दात तुटतील.
अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ममता बॅनर्जी आजही आपल्याला वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात. तर बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना देखील वर्षातून तीन ते चार वेळा ढाका येथून मिठाई पाठवता असे म्हणाले होते. जेव्हा ममता बॅनर्जी यांना हे समजले तेव्हापासून ममता बॅनर्जी देखील वर्षातून दोन ते तीन वेळा आपल्याला मिठाई पाठवत असल्याचे मोदींनी म्हटले होते.
WB CM in Asansol: Modi didn't come to Bengal earlier and in elections he needs votes from Bengal. We will give him rasgulla from Bengal. We will make sweets from soil and put pebbles in it similarly like cashew nuts & raisins are used in laddu, that will break teeth. pic.twitter.com/5QsdNgQ9lh
— ANI (@ANI) April 26, 2019