आगामी 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

पोलिसनामा ऑनलाईन – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्याच बरोबर घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडले असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

मुंबई, रायगड, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबादमध्ये आज तुरळक पाऊस पडेल. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याशिवाय 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. हवामानाच्या या बदलांमुळे सुमुद्र किनारा असलेल्या भागांमध्ये मोठा प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेगही मोठा प्रमाणात असेल. यादरम्यान, समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू आहे. पण पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे.