येत्या 24 तासात अतिवृष्टीचा ‘इशारा’, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर रायगडमध्ये ‘रेड अलर्ट’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून त्याचा आणखी जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून 24 तास वीजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर पुढील 24 तासांत रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तास वीजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज आहे.
(2/n) #WeatherAlert For #Maharashtra : Moderate rain and thunder shower with isolated heavy would occur at many places over Dhule, Gadchiroli, Gondiya, Hingoli, Jalgaon, Jalna, #Kolhapur,#Latur, #Mumbai, Mumbai Suburban districts during next 10-12 hours. #maharashtrafloods
— SkymetWeather (@SkymetWeather) September 19, 2019
गुरुवारी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज (20 सप्टेंबर) मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस पडतो आहे. काही भागात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वारा आणि पाऊस सुरू आहे. आज पुन्हा पहाटेपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.
धरणे ओव्हर फ्लो होण्याची भीती-
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर तालुक्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील पाच धरणं सुमारे 92.17 टक्के भरली आहेत. असाच पाऊस सुरू राहिला तर धरणं ओव्हर फ्लो होण्याची भीती आहे.
Visit – policenama.com
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा