काँग्रेस-राष्ट्रवादीवाले कितीही बोंबलले तरी, मतदान भाजपलाच : चंद्रकांत पाटील

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन – जनसंघर्ष आणि निर्धार यात्रेवरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँगेस आणि राष्ट्रवादी पक्षांवर मोजक्या शब्दांत पण मारक अशी टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आशा कितीही यात्रा काढून गावोगाव बोंबलत फिरले तरी लोक भाजपलाच मतदान करणार. तसे चित्र आतापर्यंतच्या निवडणूक निकालावरुन स्पष्टपाने दिसत आहे.असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. इस्लामपूर येथील कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने कालपासून निर्धार परिवर्तन यात्रेला सुरवात केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजपला वेठीस धरून त्यांच्यावर जोरदार टीका करतांना दिसत आहेत. या पार्शवभूमीवर इस्लामपूर येथील कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी देखील संधी न सोडता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला.
या कार्यक्रमादरम्यान यात्रांबद्दल विचारणा केली असता त्यांनी काँग्रस- राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. या दोन्ही पक्षांनी कितीहि यात्रा काढल्या तरी भाजप पक्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेला आहे सर्वसामान्यांना अनुसरून अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत.याचा फायदा देखील सर्वांना होत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आगामी निवडणुकांत औषधाला देखील शिल्लक राहणार नाहीत.असे देखील ते यावेळी म्हणाले. यांच्या यंत्रांमुळे वेगवेगळ्या यंत्रांची नवे तरी आम्हाला  कळाली असा टोला देखील त्यांनी राष्ट्रवादींच्या नेत्यांना लगावला.