BJP च्या वाईट कारभारावर शांत राहण्याऐवजी जेलमध्ये राहणं पसंत करेन : ममता बॅनर्जी

मिदनापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत. किंवा सत्ता सोडावी. बीजेपीच्या वाईट कारभारावर शांत राहण्याऐवजी अथवा ते सहन करण्याऐवजी, जेलमध्ये राहणे पसंत करेल, असे पश्चिम मिदनापूर येथे एका रॅलीला संबोधित करताना पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्यात.

पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढविला आहे.

यावेळी ममता यांनी दावा केला, की ”भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत अथवा सत्ता सोडावी. शेतकर्‍यांच्या अधिकारांवर घाला घातल्यानंतर सत्तेत राहणे योग्य नाही.” भाजपला ”बाहेरील लोकांचा पक्ष” म्हणत ममतांनी, त्या बंगालमध्ये कधीही भगव्या पक्षाचा कब्जा होऊ देणार नाही.

पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांनाही आवाहन केले आहे की, त्यांनीही अशा प्रयत्नांना विरोध करावा. त्यांचा पक्ष तिसर्‍यांदा सत्तेत आल्यास, पुढील वर्षी जून महिन्यानंतरही मोफत रेशन दिले जाईल. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होणार आहे.

…तर त्यांनी तृणमूल सोडले तरी चालेल : ममता

तत्पूर्वी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील स्थानिक पक्ष असलेल्या तृणमूलमध्ये पक्षांतराचे वारे वाहत आहेत. एक आमदार आधीच भाजपमध्ये दाखल झाला. तर, काही दिवसांपूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक व ममतांचे मंत्री अधिकारी यांनी राजीनामा दिला होता. त्याच्यासोबतची शिष्टाई यशस्वी ठरल्यानंतर मुख्यमंत्री ममता यांनी पक्षातील नेत्यांना दम भरला होता.

ममता यांनी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, जे लोक पक्ष विरोधी कारवाया करत आहेत, विरोधी पक्षाच्या संपर्कामध्ये आहेत ते पक्ष सोडण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे म्हटलं होतं. यावेळी ममता यांनी नाव घेतले नसले तरीही त्यांचा हा इशारा नाराज असलेले नेते शुभेंदू अधिकारी व पक्षाच्या विरोधात बोलणारे काही नेते, आमदार यांच्यासाठी होता, असे समजत आहे.