कंधार विमान अपहरण प्रकरणात अपहरणकर्त्यांच्या बदल्यात ममता स्वतःला बंधक बनवण्यासाठी होत्या तयार – यशवंत सिन्हा

कोलकत्ता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांवरून राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. त्यांनी भाजपावर हल्ला चढवून असा दावा केला की, तृणमूल काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल. यशवंत सिन्हा म्हणाले, ”ममता बॅनर्जी यांनी कंधार विमान अपहरण दरम्यान बंधकांच्या बदल्यात स्वतः बंधक बनण्याचा प्रस्ताव दिला होता.”

नेपाळची राजधानी काठमांडूहून दिल्लीकडे उड्डाण करणारे भारतीय एअरलाईन्सचे विमान आईसी-८१४ हे विमान २४ डिसेंबर १९९९ रोजी हरकत उल मुजाहिद्दीन या दहशतवादी गटाच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात भारताला मसूद अझर, अहमद ओमर सईद शेख आणि मुस्ताक अहमद जर्गर या तीन दहशतवाद्यांनी अपहरणकर्त्यांकडे सुपूर्द करावे लागले.

यापूर्वीही ते म्हणाले की, ‘निवडणूक आयोग आता स्वतंत्र संस्था नसल्याची खंत मी व्यक्त करत आहे. निवडणुका विकृत करण्याचा निर्णय हा मोदी-शहा यांच्या अखत्यारीत घेण्यात आला असून त्याचा फायदा भाजपच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे. ते बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील भयंकर संघर्षाबद्धल बोलले आणि म्हणाले, ‘देशात आज भाजपचे एकच उद्दिष्ट आहे, प्रत्येक निवडणुका येन- केन प्रकरणात जिंकणे. म्हणून ममताजींवर नंदीग्राममध्ये हल्ला केला.’

त्याचबरोबर, भाजप केंद्रीय निवडणूक समिती राज्यातील उमेदवारांच्या यादीबाबत विचारमंथन करण्यासाठी बैठक घेत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांसाठी असलेल्या उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली. पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या प्रारंभिक टप्प्यांसाठी उमेदवारांची निवड केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांवर आम्ही चर्चा करू. लोक ममता बॅनर्जी यांच्या ‘विसर्जन’ साठी तयार आहेत.

जाणून घ्या काय आहे राज्य निवडणुकीची हालचाल
-माजी भाजप नेते यशवंत सिन्हा TMC भवन पोहचले. आज ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. यशवंत सिन्हा म्हणाले, ‘अटलजींच्या वेळी bjp एकमताने काम करायचे पण आजचे सरकार कुचराई आणि जिकंण्याचे धोरण अवलंबत आहे. अकाली, बीजेपीने भाजपा सोडला. आज भाजप बरोबर कोण आहे ?

– नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींना झालेल्या दुखापतीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, राज्यातील लोक अनेक पद्धतींचा वापर करतात. ममता बॅनर्जींची पार्टी तुटत आहे. आता त्यांच्याकडे स्टार प्रचारक नाही आहे. त्या घाबरत आहेत, नवनवीन पद्धतींचा वापर करून लोकांची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यापूर्वी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ३० निर्वासित क्षेत्रांसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची तपासणी करण्यात आली होती. छाननीनंतर भाजपा, तृणमूल काँग्रेस, टीएसी आणि काँग्रेसचे उमेदवार नाकारले गेले. अधिकाऱ्यांच्या अनुसार, एकूण २२२ उमेदवारांनी २७ मार्च ला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज दाखल केला. त्यापैकी १६ उमेदवारी अर्ज अवैध ठरले.