उपवास करण्याचे काय आहेत फायदे… 

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

प्रत्येक धर्मामध्ये उपवास केला जातो, त्याची करणे वेगळी असतील परंतु उपवास हा केवळ धार्मिक कारणांपुरता मर्यादीत नसून त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. भारतीय संस्कृतीचा उपवास हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. महिन्यात,आठवड्यात  एकदा तरी उपवास केला जातो. धार्मिक कारणासोबतच  उपवास करण्याचे काही आरोग्यदायी काही फायदे सुद्धा आहेत. त्यामुळे आहाराचं नियोजन करून उपवास केल्यास आपल्या फायद्याच ठरू शकते.

[amazon_link asins=’B01MY0SWR5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b305d244-8e24-11e8-9300-8f45d7697ca8′]

डीटॉक्सिफिकेशन –

आयुर्वेदानुसारही अनेक आजारांचं मूळ हे शरीरात साचून राहणारे घातक/विषारी घटक हे आहे. त्यामुळे उपवास केल्याने पोटाला आराम मिळतो आणि घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते.

पचनसंस्थेचे कार्य सुधारते –

फळं आणि हलका आहार घेऊन उपवास केल्यास पचनकार्यालाही चालना मिळते. पचनसंस्थेवर आलेला दाब थोड्या प्रमाणात हलका करण्यास मदत होते.

मन शांत होते –  

वातावरणाचा, गुरूत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर परिणाम होतो. त्यातूनच मूड स्विंग्स तयार होतात. मानसिक ताणतणाव वाढला की चिडचिड, मत्सर यासारख्या भावनाही वाढतात. उपवास केल्याने पोटात अ‍ॅसिड बिल्डअप वाढतो. त्यामुळे अनेक अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवणं सुकर होते.

उर्जा मिळते –

शरीर आणि मन डिटॉक्स झाल्यानंतर त्यामधून शरीरालाही उर्जा मिळते. अधिक प्रसन्न आणि रिफ्रेशिंग वाटते.

उपवासाला ही काळजी घ्या –

उपवास करताना आहाराचं, व्यायामाचं आणि आरोग्याचं गणित सांभाळा. खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा. खूप तेलकट किंवा सतत खात राहणं टाळा. त्याऐवजी राजगिरा थालिपीठ, फळं असा हलका आहार घ्या. यामुळे पचनकार्यावर भार येणार नाही.  खाण्यासोबतच मुबलक पाणी किंवा लस्सी, ताक यासारखे पेययुक्त पदार्थ आहारात ठेवा.

जाहिरात