कलम 370 हटविल्यानंतर होणार ‘हे’ 10 मोठे बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने भारतीय राज्यघटनेतील बहुचर्चित कलम ३७० हटवून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतला जम्मू काश्मीरचे संपूर्ण चित्रच पालटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० आणि ३५ अ ही कलमे हटवण्याची शिफारस केली. ही कलमे हटविल्यानंतर काय काय बदल घडून येणार आहेत जाणून घेऊ या.

३७० हटविल्यानंतर होणारे १० महत्वपूर्ण बदल :

१) जम्मू काश्मीरसाठी असलेली स्वतंत्र राज्यघटना समाप्त.

२) काश्मीरचा स्वतंत्र झेंडाही रद्द होणार आहे. अर्थात जम्मू आणि काश्मीरमध्ये तिरंगा फडकावला जाईल.

३) काश्मीरमधील लोकांचे दुहेरी नागरिकत्व संपुष्टात येणार आहे.

४) जम्मू आणि काश्मीर आता वेगळे राज्य राहणार नसून तो केंद्रशासित प्रदेश होईल.

५) जम्मू-काश्मीर हा विधानसभा असणारा केंद्रशासित प्रदेश असेल.

६) भारतीय संसद यापुढे काश्मीरसाठीही सर्वोच्च असेल. भारताची राज्यघटना या प्रदेशाला पूर्णपणे लागू होईल. यानंतर जम्मू-काश्मीरची वेगळी राज्यघटना नसेल.

७) लडाख याचे विभाजन होऊन तो केंद्रशासित प्रदेश बनला. मात्र इथे विधानसभा असणार नाही. इथला प्रशासकीय कारभार चंदीगडप्रमाणे चालवला जाईल.

८) कोणताही भारतीय नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी करू शकतो

९) जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार कायदा, सीजीए लागू होणार भारतीयांना काश्मीरमधील संपत्ती खरेदी करण्याचा आणि काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्याच्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेपही करता येणार आहे.

१०) कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत केवळ त्याच राज्यातील नागरिकांना मतदानाचा अधिकार होता. इतर राज्यांमधील नागरिक तिथे मतदानही करू शकत नाही आणि निवडणुकीत उमेदवार म्हणूनही उभे राहू शकत नाहीत. केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयानंतर भारतातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन मतदानही करू शकतो आणि उमेदवारही होऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त