‘सत्ता गेल्यानंतर सगळेच जमिनीवर येतात’, सत्यजित तांबेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. यामध्ये पिकांचं नुकसान झाल्याने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.यावरुन राज्यात राजकारणालाही सुरुवात झाली आहे. सत्ताधारी- विरोधकांत जुंपली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्य सरकारला यावरुन टार्गेट करुन जोरदार टीका केली जात आहे. यापार्श्वभूमीवर युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेत्यांचे काही फोटो शेअर करत त्यांनी सत्ता गेल्यावर सगळेच जमिनीवर येतात अशा आशयाचं ट्विट करीत फडणीवसांना चिमटा काढला. सत्यजित तांबे यांनी सुरुवातीला ट्विट करताना म्हटलं की, माणूस सत्तेवर असतांना जमिनीवर पाहिजे. सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी फडणवीस सरकारमधील नेत्यांचे विमानातून पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोटो तसेच ठाकरे सरकारमधील नेत्यांचे प्रत्यक्ष जमिनीवरुन पूरस्थितीची पहाणी करतानाचे फोट टाकले आहेत. तसेच या फोटोंना त्यांनी फरक, जमिनीचा व हवेचा असं कॅप्शनही देण्यात आल आहे.