लोकसभेचे अध्यक्ष बनलेले ओम बिर्ला यांच्याबद्दल ‘हे’ माहितीय का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानातील कोटा येथील खासदार ओम बिर्ला हे लोकसभेच नवे अध्यक्ष असणार आहेत. भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ओम बिर्ला यांचे नाव राष्ट्रीय राजकारणात कधी प्रखरतेने समोर आले आहे. ओम बिर्ला यांची निवड करुन मोदी शाह जोडीने सर्वांना धक्काच दिला. यावरुन हे देखील स्पष्ट होते की महत्वाच्या पदासाठी फक्त अनुभव गृहित धरला जात नाही. तर गुणवत्ता देखील महत्वाची ठरते. मोदी सरकारने सोमवारी पार पडलेल्या बैठकीत गुणवत्ता, निपुणत्ता आणि तत्परता याने परिपुर्ण व्यक्ती हावा यावर फोकस केल्याने हे स्पष्ट झाले होते की वरिष्ठता आणि अनुभव एवढाच पद मिळवल्यासाठीची पात्रता नाही.

कोण आहेत ओम बिर्ला
फक्त २ वेळा खासदार असलेले ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर लोक हे तपासात आहेत की बिर्ला यांना मोदी सरकारने लोकसभेचे अध्यक्ष का बनवण्यात आले. तर काही लोक बिर्ला यांच्या कमी अनुभवावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. बिर्ला राजस्थान सरकारमध्ये संसदीय सचिव देखील होते. यावेळी त्यांनी अनेक चांगली कार्य पार पाडली. २०१४ च्या अनेक संसदीय समितीत देखील ते होते. याशिवाय त्यांची सर्वांना एकजूट करण्याची क्षमता देखील चांगली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे संबंध उत्तम आहेत. ते ऊर्जावान आहेत. या सर्व कारणाने त्यांना लोकसभेचे अध्यक्ष बनवण्यात आले.

राजकीय कारकिर्द
ओम बिर्ला यांचा जन्म ४ डिसेंबर १९६२ ला झाला. २०१४ च्या १६ व्या लोकसभेत ते पहिल्यांदाच खासदार झाले. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूकीत देखील ते त्याच मतदार संघातून पुन्हा निवडूण आले. या आधी २००३, २००८ आणि २०१३ ला ते राजस्थानातील कोट्यातून विधायक होते. म्हणजेच ते एकूण तीन वेळा आमदार होते. तर दो वेळा खासदार आहेत, अशी ओम बिर्ला याची राजकीय कारकिर्द आहे.

 

अनेक समित्यांमध्ये सदस्य
२०१४ साली पहिल्यांदा खासदार झाल्यावर त्यांना अनेक समित्यामध्ये जागा मिळाली. त्यांनी याचिका समिती, ऊर्जा संबंधित स्थायी समिती, सल्लागार समिती अशा समित्यांचे सदस्य बनवण्यात आले होते. १९९२ ते १९९५ हे राष्ट्रीय सहकारी संघ लिमिटेडचे उपाध्यक्ष देखील होते. कोटात सहकारी समितीत देखील त्यांना महत्व दिले जाते. त्याची पत्नी अमिता बिर्ला व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्या वडीलांचे नाव श्रीकृष्ण बिर्ला आणि आईचे नाव शकुंतला देवी आहे. ओम बिर्ला यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत.

रोगींसाठी उपचार
राजस्थान सरकारमध्ये ते संसदीय सचिव देखील होते, या दरम्यान त्या गंभीर रोगांनी ग्रसलेल्या लोकांच्या उपचारासाठी ५० लाख रुपयांची वित्तीय मदत केली होती. ऑगस्ट २००४ मध्ये आलेल्या पुरात त्यांनी काम केले आहे. ओम बिर्ला तेव्हा आधिक चर्चेत आले जेव्हा त्यांनी स्वतंत्र दिनी आजादी के स्वर असा कार्यक्रम आयोजित करुन १५ हजार पेक्षा आधिक अधिकाऱ्यांना सन्मानित केले. हा समारोह कोटा आणि बुंदी मध्ये आयोजित करण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

आलेला ताप हा साधारण ताप समजू नका. डॉक्टरांना दाखवून त्या तापाचे लवकर निदान करा

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय