आता तर सर्व देशच काश्मीर बनलाय, भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचा PM मोदी आणि HM शहांवर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे माजी वित्तीय मंत्री यशंवत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना घरचा आहेर दिला आहे. यशवंत सिंह यांनी हल्लाबोल करत सांगितले की देशातील अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकास करु असा दावा सरकारने केला होता. परंतु प्रत्यक्षात संपूर्ण देशात काश्मीरसारखी परिस्थिती उद्भवली आहे.

यशवंत सिन्हा यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की जामिया मिलिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला ते संबोधित करत होते. सरकारने कलम 370 आणि 35 अ हटवला कारण जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला जाईल. हे मतभेद दडपण्याचे तत्व आहे असा आरोप सिन्हांनी केला.

यशवंत सिन्हा म्हणाले की सरकारमधील नेत्यांनी दावा केला होता की ते काश्मीरला भारताच्या इतर राज्यांप्रमाणे बनवतील. परंतू आज पाच महिन्यानंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यासारखा नाही तर उर्वरित भारत काश्मीर सारखा नक्की बनला आहे. काश्मीरमध्ये शोपियान, बारामुल्ला आणि पुलवामा येथे सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त दिसतो अशीच परिस्थिती दिल्लीत आहे.

यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर परखड टीका केली. ते म्हणाले की, पोलीस आणि गुंडामध्ये फारसा फरक राहीला नाही. तुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण तुम्हाला दिसेल. याआधी ते दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत होते परंतु आता गुंडाचा वापर होतो आहे. सिन्हा म्हणाले की जेएनयूमध्ये जे काही झाले त्यांने सरकारी पोलीस आणि सरकारी गुंडांमधील फरक संपला. पोलीस येथील निरापराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतात. ही संपूर्ण देशातील एक विचित्र अशी परिस्थिती आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/