मी हा निर्णय का घेतला, सध्या देश पातळीवरचा सध्या जी अस्वस्थता आहे. त्यानंतर येत्या काही काळात देशात तरुणाची संख्या वाढते आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी या सगळ्याला केवळ एकच व्यक्ती न्याय देऊ शकतो तो म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब.
शिवसेनेत असतांना सुद्धा पक्षप्रमुख आणि शिवसैनिकांनी चांगले प्रेम दिले पण काही निर्णय घ्यावे लागतात. ज्यानेत्याच्या गाडीच्या पाठीमागे आम्ही आमच्या गावी पळत जायचो केवळ त्यांची एक छबी पाहायला मिळेल का यासाठी पळत जायचो आज त्याच नेत्याच्या पक्षात प्रवेश करतांना आज आनंद होत आहे. असे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्र लिहून शिवसबंधं का सोडले याचा खुलासा केला आहे.
दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतुक केले. याचबरोबर कोल्हे हे प्रतिभावंत आहेत. त्यांनी शिवाजी आणि संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर उभा केला, असेही त्यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, कोल्हे हे स्वतः डॉक्टर आहेत. याचबरोबर उत्कृष्ट कलाकारही आहेत. त्यांच्या कलेचा निवडणुकीमध्येही निश्चित फायदा होईल, असे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटले.