नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वादळी चर्चेनंतर अखेर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक आज मंजूर झाले. शिवसेनेने सभात्याग केल्याचा फायदा भाजपला झाला. विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 मते पडली. शिवसेनेने मतदानातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला ? याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
Sanjay Raut, Shiv Sena when asked if Shiv Sena's stand over #CitizenshipAmendmentBill2019 will affect 'Maha Vikas Aghadi' govt in Maharashtra: What effect will it have? We have kept forth our view. We are an independent political party. We have our own role. pic.twitter.com/26LwZ64KLh
— ANI (@ANI) December 11, 2019
संजय राऊत म्हणाले, व्होट बँक मजबूत करण्यासाठी हा प्रयत्न आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहेत. त्यांच्याबद्दल कोणतीही भूमिका मोदी सरकारने स्पष्ट केलेली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच बाहेरून शरणार्थी घेत आहात, पण श्रीनगरमधील काश्मिरी पंडिताबद्दल कोणतीही भूमिका मांडत नाही. 370 कलम हटवल्यानंतर काश्मिरी पंडितांना त्यांच्या भूमित अजूनही जाता येत नसल्याचे राऊत यांनी सांगितले.
जम्मू काश्मिरमधील पंडीतांबाबत सरकारकडे कोणतेही उत्तर नाही. त्यामुळे आम्ही सभागृहातून बाहेर पडलो. शिवेसेनेच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का ? असे विचारले असता असा कोणताही परिणाम होणार नाही. आमचा पक्ष हा स्वतंत्र आहे. आमची भूमिका आम्ही ठामपणे मांडली आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
Visit : policenama.com
- पायी वेगाने चालण्याचे ‘हे’ आहेत तब्बल ३४ फायदे, वाचून व्हाल थक्क !
- मडक्यातील पाण्याचे ९ फायदे आणि फ्रिजच्या पाण्याचे ५ तोटे जाणून घ्या
- ‘सुपरफूड अॅवोकॅडो’! खाताना, खरेदी करताना, साठवताना ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- लठ्ठपणाच्या दुष्परिणामांचे ‘हे’ आहेत २ मुख्य प्रकार, जाणून घ्या
- तुम्ही लठ्ठ आहात का ? ‘या’ २ पद्धतीने ओळखा, नेहमी लक्षात ठेवा या ४ गोष्टी
- काविळ, दम्यावर कांदा गुणकारी ! ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे