अंतर तर तेवढंच मग विशेष गाड्यांसाठी दीडपट भाडे का ? रेल्वे प्रवाशांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या ( Corona) संकटामुळे गेली काही महिने लोकल ( Local) सेवा बंद होती. पण आता विशेष लोकल आणि मेल, एक्स्प्रेस ( Express) गाड्या चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मेल, एक्स्प्रेस गाडीचे अंतर समान, थांबा समान असूनही दीडपट जास्त भाड्याचा भुर्दंड का, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. रेल्वे प्रवासी प्रसाद पाठक ( Prasad Pathak) म्हणाले की, मध्य रेल्वेकडून सध्या ठराविक मेल, एक्स्प्रेस गाड्या या स्पेशल म्हणून चालवण्यात येत आहे.

कोयना विशेष गाडी आहे ती मूळ कोयना गाडी ज्या वेगाने ज्या थांब्यावर थांबत होती ते सर्व थांबे समान आहेत. मग दीडपट जास्त तिकीट दर ( Ticket Rate) का, नेहमीच्या दरानुसार गाड्या सोडल्या तरी फिजिकल डिस्टन्स ( Physical Distance) पाळले जाऊ शकते. मग ही लूट का केली जात आहे, असा प्रश्न अनेक रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे. थांबे समान आणि अंतर समान असेल तर जास्त भाडे आकाराने चुकीचे आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रारही करण्यात आली आहे असे मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटीयन ( Madhu Kotiyan) यांनी सांगितले.

सण, उत्सवामुळे विशेष दर
कोरोनामुळेच नाही तर सण, उत्सवात जेव्हा विशेष गाड्या चालवल्या जातात. तेव्हा रेल्वे प्रशासनाकडून अधिक तिकीट दर आकारण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे चालत आले आहे. कोरोनामुळे जास्त भाडे आकारले जाते, असे काही नसल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.