राणेंचा CM ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा खासदार नारायण राणे यांच्याकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी होती. मात्र त्या निमित्ताने मुख्यमंत्री यांच्या ट्विटर हॅण्डलरवरून सावरकरांना अभिवादन करण्यात आले नाही. याच मुद्द्यावरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी” असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणले आहे. नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हि टीका केली आहे.

काय म्हणाले नारायण राणे
“काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सीएमओ महाराष्ट्र आणि मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरुन अभिवादन व्यक्त करण्यात आले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर म्हणजे हिंदुत्वाचा विसर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी.” असे ट्विट करत त्यांनी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

या अगोदरसुद्धा नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीका करण्यात आली होती. “शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवं ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही.” अशा प्रकारची टीका नारायण राणे यांच्याकडून करण्यात आली होती.