आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर – राणेंचा टोला 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करत आहेत आधी त्यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधून दाखवावं’ असं प्रत्युत्तर नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. काल झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर सडकून टीका केली. ‘दरवर्षी रावण उभा राहतो मात्र भाजपाला राम मंदिर उभारता आले नाही’ असे उद्धव ठाकरे म्हणाले म्हणाले. या टीकेला नारायण राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच निवडणुका जवळ आल्या असल्यानेच शिवसेनेला राम मंदिराची आठवण आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काल झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना, येत्या २५ नोव्हेंबरपासून अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. शिवाय आजपर्यंत राम मंदिराबाबत जे काही प्रश्न मी सरकारला विचारले आहेत तेच प्रश्न मी थेट तेथून विचारणार आहे असंही ते म्हणाले होते. पुढे ते म्हणाले की, ‘राम मंदिर बांधणार की नाही हे आधी भाजपाने सांगावे आणि त्यांना शक्य नसेल तर ते आम्ही बांधू .’ याच वक्तव्याला धरून नारायण राणे यांनीही टीका केली आहे. ‘शिवसेनेला मुंबईतल्या समस्या सोडवता आल्या नाहीत. शिवसेनेचे मंत्री केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत मग इतके दिवस राम मंदिराचा प्रश्न का उपस्थित केला नाही’ असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला आहे. इतकेच नाही तर तसंच एवढाच स्वाभिमान होता तर राजीनामा देऊन शिवसेनेचे मंत्री बाहेर का पडले नाहीत? असा खोचक प्रश्नही राणेंनी उपस्थित केला.

धक्कादायक : ब्लड बँकेतून घेतलेले रक्त निघाले एक्स्पायर झालेले

सरसंघचालक मोहन भागवत यांनीही उद्गार चिन्हांमध्ये न बोलता थेट सरकारला मंदिर बांधण्याचा आदेश दिला पाहिजे. हे करा, ते केलं पाहिजे, असं झालं पाहिजे असं बोलून काय फायदा असा सवालही त्यांनी केला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेलं भाषण म्हणजे किर्तनकार आले आणि किर्तन करून गेले या ढंगाचं होतं असं म्हणत या भाषणाचीही राणेंनी खिल्ली उडवली आहे.