सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आणि त्यामध्ये यंदा प्रथमच सर्व फळबागांचाही समावेश करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पुण्याचे पालकमंत्री व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करण्यात येत असून संबंधित विभागांना तसेच आदेश दिले आहेत असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 6 नोव्हेंबर पर्यंत पंचनामे पूर्ण करा, असे आदेशही त्यांनी दिले. पुरंदर तहसील कार्यालयात पुरंदर, बारामती, इंदापूर येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, तहसीलदार रुपाली सरनोबत, सोनाली मेटकरी, विजय पाटील आदी उपस्थित होते.
बाधित क्षेत्रांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, आवश्यकता भासल्यास पंचनाम्याची पथके वाढविण्यात यावीत. प्रसंगी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची देखील मदत घ्यावी, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले. प्राथमिक स्तरावर 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित मदत केंद्र सरकारकडे मागू. हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री पाटील यांनी प्रारंभी तालुकानिहाय नुकसानीचा आढावा घेतला. तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी पुरंदर तालुक्यातील भिवरी, बोपदेव, चांबळी, हिवरे येथील अतिवृष्टीनेग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहात महत्त्वाची पावले…
– दहा हजार कोटी रुपये नुकसान भरपाई यापूर्वीच जाहीर.
– निधीची कमतरता भासू देणार नाही.
– फळबागांना प्रथमच नुकसान भरपाईचे संरक्षण देण्यासाठी प्रयत्न.
– पीक विम्याचे कवच वाढवण्यास व्यापक मोहीम.
– नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज वसुली थांबवण्याचे बँकांना आदेश.
– प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचा शिवारात जाऊन ऑन ग्राउंड रिपोर्ट.
– प्रथमच फळबागांचाही समावेश.
– कर्ज वसुली थांबविण्याचा बँकांना आदेश.
– पिक विमा संरक्षण वाढवण्यास व्यापक मोहीम.
– 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करणार.
Visit : Policenama.com
- भात खाण्याचे ‘हे’ १० फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क ! बिनधास्त करा सेवन
- क्रिस्टिना सिल्वाने ‘मस्कुलर बॉडी’ कशी बनवली ? जाणून घेवूयात रहस्य
- वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहे सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या
- ‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय
- भातामुळे वाढत नाही लठ्ठपणा, जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
- मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट
- सावधान ! जास्त फळे खाल्ल्याने वाढू शकते वजन, जाणून घ्या कारणे
- गर्भातच मुलाला मिळेल अनुवंशिक आजारातून मुक्तता
- ‘सिक्स पॅक्स अॅब्स’ हवेत का ? मग ‘हे’ सोपे व्यायाम प्रकार आवश्य करा
- पौष्टिक पदार्थांपेक्षाही ‘पाणी’ आहे सरस !