म्हणून मराठा क्रांती मोर्चा लोकसभेच्या रिंगणात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे. असे म्हणत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मराठा कर्टनी मोर्चाने ही घोषणा केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारीत सुरु केली आहे. याचदरम्यान मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे. याचबरोबर भाजपाच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही मराठा समाजावर अन्यायच केला आहे. असे म्हणत मराठा क्रांती मोर्चाने ही घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे, मोर्चे काढून काहीही साध्य होणार नाही, दबाव आणणे हीच आमची मुख्य भूमिका असून प्रत्येक स्तरावर आमची फसवणूक करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, कमळाने फसवले, अशी सुमारे तीन कोटी पत्रके छापून त्याचे वाटप केले जाईल असेही मराठा क्रांती मोर्चाने म्हंटले.

बैठकीत झालेले महत्वाचे मुद्दे

कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल. कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यातील आरक्षणाची मागणी वगळता अन्य मागण्यांची पूर्तता झालेली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणुकीत कमळावर बहिष्कार टाकू, असा इशाराच मराठा संघटनांनी दिला. याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.