सलमान-रणबीरमधील वैर मिटणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेता आणि भाईजान सलमान खान हा अनेक कलाकारांसाठी गॉडफादर आहे. त्याच्याशी सहसा कोणी पंगा घेण्याच्या भानगडीत पडत नाही. असे असले तरी त्याला टक्कर देणारे अभिनेतेही इंडस्ट्रीत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे अभिनेता रणबीर कपूर. गेल्या काही वर्षांपासून सलमान आणि रणबीर यांच्यात असणारं शीतयुद्ध शमणार असल्याचं दिसत आहे. कारण त्यांच्यातील भांडण आता मिटणार असल्याच चर्चा होत आहे.

सलमान आणि रणबीरचं भांडण मिटण्यामागे कारण आहे ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट. आलियामुळेच या दोघांमधील कटुता नाहीशी होईल असे म्हटलं जात आहे. कारण आलिया आणि सलमान येत्या काळात एकत्र चित्रपटात काम करणार आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ईन्शाल्ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सलमान आणि आलिया एकत्र दिसणार आहेत. आता रणबीर आणि सलमान यांच्यातील शत्रुत्व मिटवण्यासाठी आलिया काही प्रयत्न करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काही वर्षांपूर्वी सलमान आणि रणबीरचं एका क्लबमध्ये भांडण झालं होतं असं समजत आहे. याला कारण म्हणजे कतरीना कैफ. तिच्यावरूनच हे भांडण झाल्याची चर्चाही समोर आली होती. यानंतर त्यांच्यातील शीत यु्द्धाला सुरुवात झाली होती. सलमान आणि रणबीर या दोघांनीही अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर निशाणा साधत एकमेकांना टोमणे मारले आहेत. आता अनेक वर्षांनंतर आलियामुळे हे भांडण मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी येणाऱ्या काळात खरंच असं काही होतं का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.