‘या’ 4 आमदारांना मंत्रिपद मिळावं म्हणून अजित पवारांची मोर्चेबांधणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करून उपमुख्यमंत्री बनलेले अजित पवार राष्ट्रवादीत पुन्हा परतले. परंतु नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही आपल्या समर्थक आमदारांना मंत्रिपदं मिळावीत यासाठी ते आग्रही आहेत. पुणे जिल्ह्यातून निवडून आलेल्या तीन आमदारांना मंत्रीपद मिळावं अशी मागणी अजीत पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात जाहीरपणे केली.

1. दत्तात्रय भरणे
बारामती जवळ असलेल्या इंदापूर मतदारसंघातून भरणेंनी भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. राज्यातील धनगर समाजातून निवडून आलेले ते एकमेव आमदार आहेत, असा दावा भरणे यांनी केला आहे. हे ध्यानात घेता भरणेंना संधी मिळू शकते.

2. सुनील शेळके
पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. या अभेद्य किल्ल्याला सुनील शेळकेंच्या माध्यमातून उध्वस्त करण्यात राष्ट्रवादीला यश आलं. जायंट कीलर ठरलेल्या सुनील शेळकेंचा उपयोग एकूण मावळ लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी आणि शेजारच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची पुन्हा हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी पहिल्यांदाच आमदार झालेल्या शेळकेंना मंत्रीपद मिळू शकतं. सुनील शेळके हे अजित पवारांचे एकनिष्ठ असल्याने त्यांना संधी दिली जाऊ शकते.

3. धनंजय मुंडे
अजित पवारांनी केलेल्या बंडात सहभागी असलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. फक्त त्यांना कोणते खातं मिळणार हे अद्याप समजू शकत नाही. अजित पवारांच्या विश्वासावर त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा हात सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

4. राजेश टोपे
राजेश टोपे यांचे वडील माजी खासदार अंकुशराव टोपे हे शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जात. मात्र, नव्या पिढीत राजेश टोपे यांचे सुर जुळले ते अजित पवारांशी. मराठवाड्यातून निवडून आलेल्या मोजक्या आमदारांपैकी एक राजेश टोपे आहेत. त्यामुळे त्यांचा नंबर लागू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/