अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का ? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे . नगर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आम्ही सरसकट कर्जमाफी करु. यासाठी तुम्ही भाजपला चले जाव म्हणा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, ‘आज अनेक खासगी कारखाने बंद पडत आहेत. यामुळे अनेकांच्या नोक-या जात आहेत. यंदा ऊसच नसल्याने नगर जिल्ह्यातील साखर कारखाने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ चालणार नाहीत. जिल्हा आर्थिक संकटात आहे. शेतक-यांचे रोज वाटोळे सुरू आहे. भाजप कारखानदारांचे कर्ज माफ करेल. पण शेतक-यांचे कर्जमाफ करणार नाही, असे अमित शहा म्हणतात.
शेतक-यांनी यांचे काय घोडे मारले ? त्यांच्याकडे पहायला वेळ नाही आणि महाजनादेश यात्रा मात्र करीत आहेत. भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का ?’ असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे एक एक करून मोठे नेते पक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेत दाखल होत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पक्ष प्रचारासाठी आणि पक्षाला उभारी देण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे.
Visit – policenama.com
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा