नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखेर भारतीय कूटनीतीचा विजय झाला. पाकिस्तानच्या ताब्यात असेलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची पाकिस्तानातून सुटका करण्यात आली. यावेळी हजारो भारतीयांसोबत अभिनंदन यांचे आई वडील देखील वाघा बॉर्डर वर त्यांची वाट पाहत होते. अभिनंदन भारताच्या हद्दीत येण्याचा तो क्षण अतिशय भावूक आणि आनंददायी होता. यावेळी उपस्थितांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला.
Visuals from Attari-Wagah border; Wing Commander #AbhinandanVarthaman to be received by a team of Indian Air Force. pic.twitter.com/C4wv14AEAd
— ANI (@ANI) March 1, 2019
‘बीटिंग द रिट्रीट’ चा आजचा सोहळा रद्द करण्यात आला होता. मात्र यावेळी अभिनंदन यांच्या सुटकेची ऐतिहासिक घटना येथे पाहायला मिळाली. यावेळी बीटिंग रिट्रीट मध्ये नागरिकांना प्रवेश देखील देण्यात आला नव्हता. यावेळी ढोल ताशांच्या गजरात अभिनंदन यांचे स्वागत करण्यात आले.
Pakistan: Visuals from Wagah in Lahore; IAF Wing Commander #AbhinandanVarthaman will soon be handed over to the Indian Air Force at Attari-Wagah border pic.twitter.com/xEPghVgNzi
— ANI (@ANI) March 1, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी होती. अखेर 26 फेब्रुवारीच्या पहाटे भारताने अतिशय चालाखपणे अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले. यात 350 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानातून देखील LOC जवळ भारतात घुसखोरीचे प्रयत्न झाले. वेळोवेळी भारताने त्यांना मुहतोड जवाब दिला.