वारणसी : वृत्तसंस्था – वारणसीमध्ये एका तरुणीला मोबाईलवर बोलताना केलेला निष्काळजीपणा चांगलाच महागात पडला आहे. या तरुणीने केलेल्या निष्काळजीपणामुळे तिला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना राजातलाव परिसरातील आराजी येथील मरुई गावात घडली. रुबी (वय-21) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून घराच्या छतावरून खाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रुबीच्या घरच्यांनी सांगितले की, त्यांचे घर दोन मजली आहे. रुबीला कोणाचातरी फोन आल्याने ती टेरेसवर गेली होती. मोबाईलवर बोलत ती चालत असताना तिचा टेरेसवरून तोल जाऊन ती खाली पडली. टेरेसवरील भिंतीची उंची कमी असल्याने तिचा तोल गेला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने चटनी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले.
रुबीच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. रुबीच्या अचानक जाण्याने तिचे वडील मेवालाल आणि आई शांती यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुबीची बहिण सविता हिने सांगितले की, रुबी हीने पदवी प्राप्त केली असून सध्या ती स्पर्धा परिक्षांची तयारी करीत होती.
- ‘ही’ आहेत कानाच्या ‘कॅन्सर’ची 7 लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष !
- दर 20 मिनिटांनी ‘वॉक ब्रेक’ घ्या, हृदयरोग असूनही मिळेल ‘लाँग लाईफ’ !
- ‘या’ 5 पदार्थांमुळे वाढतो ‘ताण’; मेंदूसाठीही ठरतात घातक !
- ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका !
- ‘नागीण’ आजाराची ‘ही’ आहेत 4 कारणे, जाणून घ्या यावरील उपाय
- बहुगुणकारी ‘लवंग’ चे सेवन करा आणि ‘या’ 5 समस्यांतून मुक्तता मिळवा
- ‘न्यूमोनिया’ वर गुणकारी ठरतात ‘हे’ 5 घरगुती उपाय !