नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीकडे आम्ही एक युद्ध म्हणून पाहात आहोत. या युद्धामध्ये भाजपाला फायदा करून देण्याऐवजी मी मृत्यूला कवटाळेल, असे वक्तव्य काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले आहे. प्रियंका गांधी या रायबरेलीमध्ये प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
#WATCH Priyanka Gandhi Vadra says," I've not said I am putting weak candidates. I've said very clearly Congress is fighting this election on its own strength. I'd rather die than benefit BJP. We have chosen candidates that are either fighting very strongly or cutting BJP votes." pic.twitter.com/UqfjfNKpxI
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 2, 2019
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशातील प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपाचा फायदा होऊ नये, भाजपाची मते खाण्यासाठी उमेदवार उभे केले असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या की, प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार दिला आहे. आमच्या उमेदवारामुळे भाजपाचा फायदा होणार नाही. आमच्यामुळे भाजपाचा फायदा होऊ अशी परिस्थिती कोठेही नाही. त्यांचा फायदा करून देण्यापेक्षा मी मृत्यूला कवटाळेल.
यंदाची लोकसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवत आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने सक्षम आणि तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे काही मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होईल आणि याठीकाणी भाजपाचा पराभव होईल किंवा त्यांची मतं तरी कमी होतील, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.