या प्रकरणात संतापाची भर टाकणारा आणखी एक प्रकार म्हणजे एकीकडे रेल्वेतील शौचालयाजवळ बसून २५ तासांचा प्रवास कुस्तीपटूंनी केला असताना दुसरीकडे अयोध्येला गेलेले बिनकामाचे पदाधिकारी मात्र विमानाने घरी परतले आहेत. या प्रवासातील छायाचित्रे कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. महाराष्ट्रातील कुस्तीपटू फैजाबाद येथून साकेत एक्स्प्रेसने निघाले होते. पावणे पाच वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेस मनमाडमध्ये पोहोचली. महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या या खेळांडूवर अशी वेळ येणे राज्याच्या दृष्टीने नामुष्की आहे.
मुंबईतील या सभेत राज ठाकरे म्हणाले, राममंदिर झाले पाहिजे का? तर झालेच पाहिजे, पण निवडणुकीनंतर झाले तरी चालेल, असे मी गुढीपाडव्याच्या सभेत बोललो होतो, आता हे दंगलीवर मतं मागायला निघाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, भगवे कपडे घालून फिरतात. मुख्यमंत्री आहेत की कोण आहेत हेच कळत नाही. जातींमध्ये आगी लावण्याचे काम करत आहेत. त्यादिवशी त्याला साक्षात्कार झाला म्हणे हनुमान दलित आहे. यांच्या सभा सुरू आहेत. वांद्रे येथे रविवारी विहींपची ही सभा झाली. तुम्ही सतर्क राहा. मुंबई पोलिसांनी बघावे काय राजकारण सुरू आहे, असे आवाहन राज यांनी पोलिसांना केले. मुख्यमंत्री योगींनी एका भाषणामध्ये ओवेसीचा उल्लेख केला, ही सुरुवात आहे, असे ते म्हणाले.