अमिताव घोष यांच्याबद्दल – ११ जुलै १९५६ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या घोष यांचं महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झालं. दिल्ली विश्वविद्यालयाचं ‘सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून उच्चशिक्षण घेतल्यानंतर ‘द सर्कल ऑफ रीजन’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बघता बघता घोष यांनी साहित्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रातही काही काळ पत्रकारिता केली.
घोष यांच्या ‘शॅडो लाइन्स’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार – ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारतर्फे साहित्याच्या क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६१ मध्ये हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आणि सन १९६५ पासून तो दरवर्षी देण्यात येतो. प्रसिद्ध मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले.
अत्तापर्यंत मराठी साहित्याला चार वेळेस हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
१९७४ ययाती- वि स खांडेकर
१९८७ नटसम्राट वि वा शिरवाडकर
२००३ अष्टदर्शने – विंदा करंदीकर