यशराज फिल्म्स आणि धर्मा प्रोडक्शनने घेतला ‘हा’ मोठा धडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या दोन नामांकित कंपनीने अशा दिग्दर्शकांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. ज्यांनी यांच्या बिग बजेट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते आणि ते चित्रपट अयशस्वी ठरले. या दोन नामांकित कंपनीचे नाव आहे. यशराज फिल्म्स आणि धर्मा प्रोडक्शन यांचे बिग बजेट चित्रपट अनेक दिवस झाले अयशस्वी ठरत आहेत.

बॉलिवूडमध्ये राजकुमार गुप्ता यांनी घोषणा केली की, त्यांच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करेल. ज्यांनी गतवर्षी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘स्त्री’ चे दिग्दर्शन केले होते. स्त्री चित्रपटासाठी सगळ्यात पहिले अमर यांनी राजकुमार गुप्ता यांच्याशी संपर्क केला होता. राजकुमार गुप्ता यांनी आपली चुक सुधारुन आगामी चित्रपटासाठी अमर कौशिकला संधी दिली आहे.

सगळ्यात पहिले धर्मा प्रोडक्शनचे करण जौहर यांचा अनेक प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपले नाव कमवू शकला नाही. या वर्षी त्यांचे दोन चित्रपट ‘स्टूडेंट ऑफ द ईयर-2’ आणि ‘कलंक’ या मेगा बजट चित्रपट बॉक्स ऑफीसवर अयशस्वी ठरला. स्टूडेंट ऑफ द ईयर-2 चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पुनीत मल्होत्रा यांनी करण जौहर यांच्यासाठी ‘आय हेट लव स्टोरीज’ आणि ‘गौरी तेरे प्यार में’ या नामक चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

या नामक चित्रपटांना प्रेक्षकांनी नकार दिला होता. एवढे होऊन देखील करण यांनी पुनीत यांना आपल्या हिट चित्रपटाचा दुसरा पार्ट बनवण्याची संधी दिली आहे. पण पुनीत यावेळेस ही तशीच चुक करेन म्हणून करणने आता पुनीतला बॅनेरच्या बाहेर काढले आहे. त्याच्या जागी करणने लेखक व दिग्दर्शक अमित शर्माची निवड केली आहे. ज्यांनी ‘बधाई हो’ सारखा सुपरहिट चित्रपट केला होता.

धर्मा प्रोडक्शनचे करण जौहर हे दिग्दर्शक शशांक खेतान व अभिषेक बरमान यांना बाहेरचा मार्ग दाखविण्याच्या मूडमध्ये आहे. यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांचा फायदा करणला झाला नाही. शशांक खेतन यांनी करण यांच्यासाठी ‘दुल्हनिया सीरीज’ आणि ‘धडक़’ चित्रपटाते दिग्दर्शन केले होते. हे चित्रपट जास्त यश मिळवू शकले नाही. हे चित्रपट यशस्वी ठरला नाही. अशामध्ये करण अभिषेक बर्मन यांच्यासोबत भविष्यात काम करणार आहे. अभिषेक बर्मन यांनी दिग्दर्शन केलेला चित्रपट ‘कलंक’ हा बॉक्स ऑफीसवर फ्लॉप झाला होता.

दुसरा बॅनर आहे यशराज फिल्म्स. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ हे प्रसिद्ध कलाकार असून देखील बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट अयशस्वी ठरला होता. या चित्रपटाचे निर्देशन विजय कृष्ण आचार्य यांनी केले होते. ज्यांना बॉलिवूडमध्ये विक्टर नावाने ओळखले जाते. विजय कृष्ण आचार्यला आदित्य चोपडाने
‘धूम-3’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शकाची जबाबदारी दिली होती. पण विजय यांनी याआधी देखील आदित्य चोपडाला ‘टशन’ हा अयशस्वी चित्रपट दिला आहे.

त्यामुळे आदित्य यांनी त्यांचे दरबाजे बंद केले आहे आणि दिग्दर्शक संजय गढवी यांच्यासाठी दरवाजा चालु केला आहे. ज्यांनी आदित्यसाठी धूम आणि धूम-2 सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला होता. याव्यतिरिक्त यशराजने दिग्दर्शक शरत कटारियाला देखील संधी दिली आहे. ज्यांनी त्यांच्यासाठी ‘दम लगा के हइशा’ आणि ‘सुई धागा – मेड इन इंडिया’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचे निर्देशन केले होते. असे म्हणले जाते की, आदित्य चोपडा आता त्यांच्यासोबत बिग बजेट चित्रपटाच्या तयारीत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’