ब्यूनस आर्यस येथे शांततेसाठी योग या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी हे जी २० शिखर परिषदेसाठी अर्जेंटिनाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून २ डिसेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत.
मोदी म्हणाले, जेव्हा व्यक्तिचा मेंदू शांत असेल तेव्हा कुटुंब, समाज, देश आणि जगातही शांतता कायम राहते. आरोग्य, कल्याण आणि शांततेसाठी जगाला भारताने दिलेली ही एक खास भेट आहे. जी-२० शिखर परिषदेत जागतिक मुद्दे, निरंतर विकास, जलवायू परिवर्तन, फरार आर्थिक घोटाळ्यातील आरोपींसारख्या मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे मोदी म्हणाले. हे फक्त भारत किंवा अर्जेंटिनाच्या फायद्याचे नाही तर यात जगाचे हित असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांची सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली. तत्पूर्वी त्यांनी ओडिशा येथे आयोजित हॉकी विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानिमित्त अर्जेंटिना संघाचे अभिनंदन केले आणि भारतीय हॉकी संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.